होते जलाशयात पाणी , श्वापदेही दूर गेली
होते खिशात नाणी , नातेही दूर गेली
होती कह्यात माझ्या , हि विशाल राजवंशी
आता झालो भिकारी , ती तुतारीही दूर झाली
ज्यांच्यात एव्हढ्याचा , एव्हढा थोरला झालो
संपताच ' माया ' माझी , माय-बापही मला विसरून गेली
काय आठवावी कालची , ती स्वप्नील स्वप्ने
वाळवंटात माझ्या तीही, मुगजळात वाहून गेली
खऱ्याचे कधी नव्हते , खऱ्याचे कधीही नाही
केली पूजा जी देवाची , आता ती पुरे झाली
Bhav purn👌👌
उत्तर द्याहटवा